लेखक, संपादक राहुल गडपाले यांनी ‘अवतरण’ या सदरासाठी लिहिलेल्या लेखांचं संकलन म्हणजे ‘अवतरणार्थ’ हे पुस्तक.
एका लहानशा खेड्यापासून UNOसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेपर्यंत विचार आणि कार्य विश्वाचा आवाका असणारे ज्येष्ठ विचारवंत डॉ. जनार्दन वाघमारे यांचे 'भारत' या राष्ट्राच्या प्रगतीसाठी कळकळीने केलेले मौलिक मार्गदर्शन.
आयकर सल्लागार व वकील म्हणून पन्नासहून अधिक वर्षे व्यवसाय करताना नावलौकिक प्राप्त करणारे अॅड. श्रीकृष्ण इनामदार यांनी 'न्याय्य-मूल्ये' जपण्याचा कसोशीने केलेला प्रयत्न... कायदेशीर लढाया असल्या तरी त्यातून काही सुरस किस्सेही घडले, त्यांचे दर्शन म्हणजे हे पुस्तक!
औद्योगिक क्षेत्राला चालना मिळावी आणि विदेशी भांडवल भारतात यावे, या उद्देशाने केंद्र सरकारने सध्याच्या कामगार कायद्यांची पुनर्रचना केली आहे. हे कामगार कायदे नेमके काय आहेत. यांची विस्तृत आणि सोपी मांडणी म्हणजे लेखक संजय सुखटणकर यांचे 'सुधारित कामगार कायदे' हे पुस्तक.
‘पंख सकारात्मकतेचे’ हे दैनिक सकाळमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखमालेचे पुस्तकरूप.
‘चैत्रपालवी’ या काव्यसंग्रहात चैत्राली तेरवाडकर- कुलकर्णी यांनी आयुष्यात जे अनुभव घेतले, त्यांना कवितेच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
महाराष्ट्राचा इतिहास नव्याने घडवणाऱ्या एका करारी, बुद्धिमान, प्रेमळ, द्रष्ट्या स्त्रीच्या चरित्राची अभिनव मांडणी. राजमाता जिजाऊ : सकलजनवादी क्रांतीच्या शिल्पकारप्रकाशनपूर्व, ग्रंथावर २०% सवलत प्रकाशनपूर्व पुस्तकाची विक्री मूल्य ₹३९९ सवलतीचा लाभ १९ सप्टेंबर पर्यंत घेता येईल, आणि पुस्तक २० सेप्टेंबरला सर्वत्र उपलब्ध होणार आहे.
विविध आजार टाळण्यासाठी आपला आहार-विहार आणि सवयी बदलणे अत्यंत आवश्यक आहे. आपली जीवनशैली, आहार नेमका कसा असावा, याविषयी माहिती देणारे पुस्तक.
आपला देश 'राष्ट्र' म्हणून कधी उदयाला आला; इथपासून ते भारतीय राष्ट्रवादापर्यंत चर्चा, नेहमी झडत असतात. यासंदर्भात डॉ. बाबासाहेब यांची 'राष्ट्रकल्पना' आजही महत्त्वाची ठरत आहे. ती कशी याचे विस्तृत मांडणी!
श्रीराम आणि श्रीविठ्ठल यांच्या एकरूपतेतून भक्ती आणि शक्तीचा संगम समस्त संतांनी कसा साधला होता, याचे समर्थपणे दर्शन घडविणारे तत्त्वचिंतनपर पुस्तक ‘राम तोचि विठ्ठल’.
P.D. Deshpande has written a historical document of India’s progress in the last 76years in his book ‘India Diary’.
लेखक पी.डी. देशपांडे यांनी त्यांच्या ‘इंडिया डायरी’ या पुस्तकात गेल्या ७६ वर्षांतील भारताच्या प्रगतीचा ऐतिहासिक दस्तावेज सादर केला आहे.
‘माझा युरोप प्रवास’ हे अशोक केसरकर यांनी खुमासदार शैलीत लिहिलेले प्रवास वर्णन आहे. डोळ्यांनी टिपलेले, मनाला भावलेले अनुभव केसरकर यांनी अत्यंत साध्या भाषेत लिहिले आहे.
‘उमेदीचा अंकुर’ या संदीप काळे लिखित लेखसंग्रहात एकूण ३५ लेख असून, त्यात विविध स्तरातील सामाजिक आशयाचे आणि सकारात्मक अनुभवांचे लेखन आहे. ‘सकाळ’ सप्तरंग पुरवणीच्या ‘भ्रमंती लाईव्ह’ या सदराअंतर्गत संदीप काळे यांनी केलेले हे लेखन आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थामधील लोकप्रतिनिधी,कर्मचारी,अधिकारी,अभ्यासक,सजग नागरिक यांना तसेच एमपीएससी , पीएसआय , एसटीआय , एएसओ या स्पर्धा परीक्षांच्या पूर्व -मुख्य -मुलाखत या तीनही टप्प्यांसाठी संदर्भयुक्त पुस्तक
जुनी वास्तू पाडून नवं बांधकाम करायचं असो अथवा नवी जागा घेऊन तिथं नव्यानं इमारत उभारायची असो , आपल्यासाठी ती नवनिर्मिती जिव्हाळ्याची ठरते. तिच्यासाठी प्रकाश मेढेकर यांच्यासारख्या कल्पक, पर्यावरणप्रेमी व अनुभवी बाधकामतज्ज्ञाचा सल्ला योग्य दिशा देऊ शकतो. हा अनमोल सल्ला ' दिशा बांधकाम नवनिर्मितीची' या पुस्तकातून आपल्याला हवा तेव्हा, हवा तितका वेळ मिळवता...
A tri-monthly magazine is (in Marathi), based on the nature and importance of questions on the current events for students studying for exams for MPSC, UPSC, Banking, Railway, Forest services, LIC and being published regularly.
Lokamanya to Mahatma is a colossal work of scholarship, at once very deep and extremely wide. Deftly translated from Marathi by Abhay Datar, this two-volume study covers an astonishing array of themes. It is sociological, investigating the politics of caste, community and region.
Inspiring Leadership Practices from the Indian MedTech Industry.
महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळींमागील विचारविश्वाची मांडणी करणारा बृहद ग्रंथ. This is people's history in people's language.
"The scope of this remarkable volume is really astonishing as it provides us a comprehensive glimpse of our multidimensional history which is as multidimensional as human life itself. With his valuable research of the period of the independence struggle, Dr. Sadanand More has indeed accomplished an outstanding task."- Prof. J. V. Naik
Inspiring Leadership Practices from the Indian MedTech Industry.
नव्या संधी, अर्थसाक्षरता, हार्डवर्क आणि स्मार्टवर्कचे महत्त्व, संभाव्य संकंटांचा वेळीच वेध, गुंतवणूक, बचतीचे धोरण आणि या सर्वांपलीकडे व्यवहारकुशलता महत्त्वाची ठरते. त्यासाठी हे पुस्तक दिशादर्शक आहे.
‘बा, तथागता!’ हे महाकाव्य छंदोबद्ध नाही. ते मुक्तछंदातील आहे. सहज आकलन व्हावे यासाठी ते तीन आविष्करणांमधून वाचकांसमोर ठेवले आहे. या तीनही आविष्करणांमध्ये संवादशैली वापरलेली आहे.
महाराष्ट्राचा इतिहास नव्याने घडवणाऱ्या एका करारी, बुद्धिमान, प्रेमळ, द्रष्ट्या स्त्रीच्या चरित्राची अभिनव मांडणी. राजमाता जिजाऊ : सकलजनवादी क्रांतीच्या शिल्पकारप्रकाशनपूर्व, ग्रंथावर २०% सवलत प्रकाशनपूर्व पुस्तकाची विक्री मूल्य ₹३९९ सवलतीचा लाभ १९ सप्टेंबर पर्यंत घेता येईल, आणि पुस्तक २० सेप्टेंबरला सर्वत्र उपलब्ध होणार आहे.
राजकीय चरित्रापलीकडची मोकळीढाकळी मांडणी
एका बाजूला प्रचंड कुतूहल वाटावं आणि दुसऱ्या बाजूला प्रचंड अस्वस्थता असावी अशा काळातील जागतिक घडामोडींचा वेध प्रस्तुत लेखन घेतं .
आपली बुद्धी असो की पैसा योग्य ठिकाणी वापरले तरच त्याला किंमत.प्रकाशनपूर्व पुस्तकाची विक्री मूल्य ₹१९९ (limited period) Free Delivery ५० व त्याहून अधिक प्रतींसाठी ३०% सवलत (₹१७५) या प्रकाशनपूर्व सवलतीचा लाभ ८ ऑक्टोबर पर्यंत घेता येईल, आणि पुस्तक ९ ऑक्टबोरला सर्वत्र उपलब्ध होणार आहे.
सकाळ साप्ताहिक हे सकाळ माध्यम समूहाचे कौटुंबीक प्रकाशन असून,राजकारण,समाजकारण,आंतरराष्ट्रीय विषय,भाषा शिक्षण,साहित्य गुंतवणूक व कला या विषयांना स्पर्श करणारे हे साप्ताहिक आहे.गेल्या 29 वर्षापासून प्रकाशनात सातत्य असणारे एकमेव कौटुंबिक साप्ताहिक.वाचकांना दर्जेदार व अधिक वाचनिय अंक देण्याचा प्रयत्न करत असते.वाचकांच्या विविध विषयांच्या अपेक्षा लक्षात घेऊनच...
तुमचा आनंद, तुमचं दुःख, तुमचं प्रेम, तुमच्या वेदना या सर्व तुमच्याच हाती आहेत. यातून बाहेर पडण्याचा एक मार्ग आहे. आणि तो मार्ग तुमच्या आतूनच आहे. - सद्गुरू
श्री एम यांची ही पहिलीच कादंबरी ‘शून्य’ ह्या संकल्पनेवरील चिंतन असून ती मर्यादा आणि अथांगता तसेच वास्तव आणि पाखंडी गोष्टींमधील भिंत मोडून टाकत, समाजातील प्रचलित कुप्रथांवर भाष्य करते.
डॉ. एस. पी. गायकवाड या तज्ज्ञ लेखकाने लिहिलेल्या या पुस्तकात मुक्त संचार गोठा पद्धती वापरण्यासाठी गुंतवणूक व खर्च, जनावरांसाठी आराम, आजार नियंत्रण, पाणी व्यवस्थापन व सेंद्रीय दूध उत्पादन या कळीच्या मुद्यांबरोबरच इतरही पूरक बाबींचा खुलासा नेटकेपणाने केलेला आहे.
आयुष्यातील ध्येयं, स्वप्नं साकार करण्यासाठी नियोजन करावं लागतं, तर आनंदी आयुष्य जगण्यासाठी आर्थिक-स्वातंत्र्य आवश्यक असतं. पण त्याकरता आधी 'अर्थ-साक्षर व्हायला हवे! अर्थ नियोजनाने सुरुवात करून आपली आर्थिक उद्दिष्टं कशी गाठावी... याचा कानमंत्र देणारं पुस्तक!
‘बा, तथागता!’ हे महाकाव्य छंदोबद्ध नाही. ते मुक्तछंदातील आहे. सहज आकलन व्हावे यासाठी ते तीन आविष्करणांमधून वाचकांसमोर ठेवले आहे. या तीनही आविष्करणांमध्ये संवादशैली वापरलेली आहे.
झटपट आणि सकस टिफिनची रेसिपीधावपळीच्या जीवनात आपण स्वत:च्या शरीराला आहारात शॉर्टकट मारायची सवय लावून घेतो. आपल्या या सवयीमुळे हळूहळू घरातल्या मंडळींचीही सवय बदलते. लहान मुलं असो किंवा मोठी मंडळी असो, आहार समतोल असेल तर आरोग्यही सुदृढ राहतं. असा हेल्दी टिफिन रोज करून देता यावा यासाठी गृहिणींना उपयुक्त अशा टिप्स या पुस्तकात दिल्या आहेत.
जुनी वास्तू पाडून नवं बांधकाम करायचं असो अथवा नवी जागा घेऊन तिथं नव्यानं इमारत उभारायची असो , आपल्यासाठी ती नवनिर्मिती जिव्हाळ्याची ठरते. तिच्यासाठी प्रकाश मेढेकर यांच्यासारख्या कल्पक, पर्यावरणप्रेमी व अनुभवी बाधकामतज्ज्ञाचा सल्ला योग्य दिशा देऊ शकतो. हा अनमोल सल्ला ' दिशा बांधकाम नवनिर्मितीची' या पुस्तकातून आपल्याला हवा तेव्हा, हवा तितका वेळ मिळवता...
सकाळ दैनिकापासून, 1932पासून, सुरू झालेला "सकाळ' माध्यम समूह महाराष्ट्रातील घराघरांत, सर्वदूर पोहोचलेला माध्यम समूह आहे. मराठी आणि इंग्लिश वर्तमानपत्रे, साप्ताहिके, मासिके, दूरदर्शन वाहिनी, इंटरनेट पब्लिशिंग तसेच पुस्तक प्रकाशन विभाग अशा विविध शाखांमधून "सकाळ' माध्यम समूहाचा विस्तार झाला आहे. सकाळ माध्यम समूहाने नेहमीच आपल्या वाचकांना स्थानिक ते जागतिक घडामोडी, माहिती आणि मनोरंजन, शिक्षण आणि सामाजिक अशा सर्वच क्षेत्रांतील अद्ययावत ज्ञान देण्याचे धोरण ठेवले आहे. "सकाळ पुस्तक प्रकाशना'च्या सूचीवर नजर टाकली तरी हेच धोरण दिसून येते. सर्वसामान्यांच्या जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करणारी माहितीपर, प्रेरणादायी आणि रंजनपर पुस्तके असे "सकाळ प्रकाशना'च्या पुस्तकांचे स्वरूप आहे. यामध्ये आपल्याला आहार, आरोग्य, आर्थिक साक्षरता, व्यतिमत्त्व विकास, पालकत्व, शेतीविषयक अशा विविध विषयांसोबतच प्रेरणादायी व्यतिचरित्रेही दिसतात. प्रवासवर्णन, व्यावसायिक संदर्भ, पर्यावरण अशा विषयांसोबतच मुलांसाठी वाचनीय पुस्तकांचाही समावेश या पुस्तक सूचीमध्ये असलेला आढळेल. त्या त्या विषयातील तज्ज्ञ, अनुभवी लेखक हे या पुस्तकांचे वैशिष्ट्य सांगता येईल. आवश्यक संपादकीय संस्कार, अंतर्गत सजावट व मांडणी, उत्कृष्ट कागद, छपाई आणि एकूणच उत्कृष्ट निर्मिती यांमुळे ही पुस्तके अधिकच देखणी होतात. अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचता यावे यासाठी या पुस्तकांचे मूल्य नेहमीच वाजवी ठेवण्यात येते. "सकाळ'च्या सर्व कार्यालयांमार्फत तसेच महाराष्ट्रातील प्रमुख विक"ेत्यांमार्फत ही पुस्तके सर्वत्र उपलब्ध करून देण्यात सकाळ प्रकाशन यशस्वी ठरले आहे. पुस्तकांचे विषय, लेखक, निर्मिती अशा सर्वच घटकांतील उत्कृष्टतेच्या आग"हामुळे ही पुस्तके वाचकांच्या पसंतीस उतरली आहेत. हीच परंपरा आगामी पुस्तकांमार्फत पुढे नेण्यास सकाळ पुस्तक प्रकाशन विभाग बांधील आहे.