"सिनेमा, करिअरमध्ये अडचणी येतात, त्यावेळी अक्षय आम्ही तुझी धडपड आठवतो मग आम्हाला मार्ग सापडतो. अक्षय, तुझी ही जिद्द, धडपड अनेकांसाठी प्रेरणा ठरो!"- प्रवीण तरडे, दिग्दर्शक, पटकथालेखक आणि अभिनेता
‘छंदातून व्यवसाय’ उभारून स्वत:ची ओळख निर्माण केलेल्या एकवीस नवउद्यमींच्या वाटचालीचा आटोपशीर आढावा रश्मि हृषिकेश गोडसे आणि प्रा. डॉ. सुभाष भावे यांनी ‘संकल्पपूर्ती - छंदातून व्यवसायाकडे’ या पुस्तकात घेतला आहे.
Unlock the secrets to financial prosperity with this timeless classic.
अर्थपूर्ण काव्यातून जीवनाचा बोध देणारे, रामनामाचे गुणगान दोह्यांमधून करणारे कविहृदयाचे संत कबीरदास जनमानसात प्रसिद्ध आहेत.
सत्य-असत्य, नीती-अनीती, प्रेम-द्वेष, सुष्ट-दुष्ट, श्रेष्ठ-कनिष्ठ या या मूल्यसंघर्षांमुळे जगणं अधिक गुंतागुंतीचं होतं. यातून मार्ग काढत जगण्याचा सुंदर आशय शोधणं हे कमालीचं अवघड असलं तरी सुखद असू शकतं, याची गोष्ट या कादंबरीत आली आहे.
कठीण परिस्थितीतही मार्ग निघतो, काढता येतो; असा विश्वास बालवाचकांना देणाऱ्या एकनाथ आव्हाड यांच्या कथा
प्रवास करणं ही कल्पनाच जेव्हा साहसाच्या कक्षेत येत होती तेव्हाच्या काळातल्या मार्को पोलो या प्रवाशाची ही गोष्ट.
कर्मवीर भाऊराव पाटील यांची शिक्षणविषयक पत्रे : एक आकलन’ या पुस्तकात डॉ. सुदाम मांडगे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील लिखित पत्रांचे संशोधन करून कर्मवीरांचे शिक्षणविषयक विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
डॉ. आंबेडकरांचे जीवनचरित्र म्हणजे भारताच्या समृद्ध इतिहासाचे आणि मानवी हक्कांसाठीच्या लढ्याचे द्योतक आहे. त्याचा हा संक्षिप्त आढावा!
'कथालंकार' या लघुकथासंग्रहात लेखिका उर्मिला भुर्के यांनी स्त्रीच्या आयुष्यातील दागिन्यांचं महत्त्व आणि जिव्हाळा उलगडणाऱ्या कथा लिहिल्या आहेत.
This beautifully crafted book guides you in connecting with the divine through the written word, specifically mantras dedicated to Lord Shiva.
जागतिक स्तरावर झपाट्याने होणाऱ्या बदलांना व मागणीला अनुसरून भारतातील दूध उत्पादकांना स्वतःमध्ये आमूलाग्र बदल घडवण्याची वेळ आली आहे. त्यासाठी सर्व दूध उत्पादकांना नवनवीन व प्रात्यक्षिकांसह माहिती देणारे डॉ. पराग घोगळे आणि प्रशांत कुलकर्णी लिखित A to Z डेअरी फार्मिंग हे पुस्तक!
This book makes you learn quick tips of self awareness ,self discovery and most importantly ,how to Love yourself.
ईशोपनिषद, केनोपनिषद आणि मांडूक्य उपनिषदावर श्री एम यांनी केलेल्या इंग्लिशमधील भाष्याचा हा मराठी अनुवाद आहे.
सद्गुरू यांच्या कोईम्बतूर येथील ईशा योग केंद्राच्या पाकगृहात त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होणाऱ्या १०० हून अधिक आगळ्या वेगळ्या आरोग्यदायी आणि तरीही अत्यंत चवदार पाककृती
कुटुंबाच्या मालमत्तेत वारसा हक्क कोणाला मिळतो? कौटुंबिक अत्याचार कशाला म्हणायचे? पोटगी मागण्याचा अधिकार कोणाला असतो? लैंगिक छळ कशाला म्हणायचे? त्यापासून संरक्षण कसे मिळवायचे? स्त्री देहाचे अश्लील प्रदर्शन म्हणजे काय? मातृत्व लाभाचे हक्क कोणते? अशा विविध प्रश्नांची उत्तरे देणारी उपयुक्त कायदेशीर माहिती
Dispelling misconceptions about veganism the book explains how becoming vegan can actually be healthy, fulfilling and even fun!
विविध टप्यांवरील माणसामाणसांतील तुटलेपण अधोरेखित करणाऱ्या माधवी सुदर्शन यांच्या खास शैलीतील कथांचा संग्रह
कार्पोरेट जगातील सत्य घटनांवर आधारित असलेली संजय सुखटणकर लिखित साडेबारा लाखांची खंडणी ही कादंबरी!
आस्तिक असो वा नास्तिक, वा अज्ञेयवादी, साधक असो वा सर्व सामान्य माणूस, हे पुस्तक खरोखर त्या सर्वांसाठी आहे, जे 'मृत्यू'ला सामोरे जाणार आहेत!
This book is a must-read, especially for young people, to understand the sacredness of the human body. Recalling Kabir in the modern times is the most appropriate premise to develop a thought process that would alleviate anxiety, instill confidence and perhaps help one attain peace, even in difficult Situations.
स्वतःची प्रगती साधायची असेल तर वाचायलाच हवं, 'रिस्किलिंग:कामातील प्रगतीसाठी, स्वतःच्या आनंदासाठी'.
संघर्षाचे स्वरूप, प्रकार यांची माहिती संघर्षाचे रूपांतर शांतीत कसे करता येईल, याबाबत मार्गदर्शन समन्वयाची वाटेवरील प्रवासाचे चित्रण
आपली बुद्धी असो की पैसा योग्य ठिकाणी वापरले तरच त्याला किंमत.
या पुस्तकातल्या आई-बाबानी आपल्या समस्या त्यांच्या डायरीत मोकळेपणाने मांडल्या आहेत. त्या समस्यांवर आपल्या बुद्धीने मार्ग काढला आहे. ही डायरी वाचून पालकत्व निभावताना आई-बाबाला नक्कीच दिशा मिळेल, असा विश्वास वाटतो.
डॉ. भरत बलवल्ली यांच्या स्वरांची आणि आयुष्याची ओळख करून घेण्यापासून ते स्वरांची शरणागती पत्करून संगीत आणि अध्यात्म यांच्या मधला दुवा प्रस्थापित करून जगातल्या गानरसिकांना एका अलौकिक आनंदाची अनुभूती करून देणाऱ्या एका स्वराधीशाचे साररूपातले हे आत्मकथन आहे.
संथ वाहणाऱ्या कृष्णेच्या तिरावरचं एक सुंदर शहर सांगली. या शहराची गेल्या सहा दशकांची ही सोनेरी पाने.
६ ते १४ वयोगटातील शाळेतल्या मुलांना वाचायला आवडतील अशा बालकविता या संग्रहात आहेत. प्रत्येक स्वर आणि व्यंजन यांच्यावर एकेक कविता कवी प्रसाद पाठारे यांनी या संग्रहात लिहिलेल्या आहेत.
लेखक पी.डी. देशपांडे यांनी त्यांच्या ‘इंडिया डायरी’ या पुस्तकात गेल्या ७६ वर्षांतील भारताच्या प्रगतीचा ऐतिहासिक दस्तावेज सादर केला आहे.
This biography delves deep into the musical, spiritual, and nation-building odyssey of Dr. Bharat Balvalli. Written by the esteemed actor and screenplay writer Pravin Vitthal Tarde, this book is a heartfelt compilation of Bharatji's musical theories, spiritual principles, and impactful social contributions.
जगातील निरनिराळे भाग, तिथली संस्कृती, ऐतिहासिक घटना, त्यांचे नायक-खलनायक किंवा या दोन्हीच्या सीमारेषांवर वावरणारी पात्रं यांची अनोखी गुंफण या पुस्तकात साकारली आहे.
अर्थशास्रातील विविध संकल्पना समजून सांगण्याकरीता विविध उदाहरणे,मुद्देसुदपणा,विविध घटकांची अद्ययावत आकडेवारी, आकृत्या यांचा पुस्तकात समावेश
ज्ञानदेवांचे पहिले विश्वासार्ह चरित्र म्हणून ज्याकडे वारकरी संप्रदाय श्रद्धेने पाहतो, ते म्हणजे भक्तशिरोमणी नामदेव महाराजांनी लिहिलेले श्री ज्ञानदेव चरित्र.
एमपीएससी परीक्षेतील मानव संसाधन विभाग आणि मानवी हक्क या पेपरच्या अभ्यासक्रमावर आधारित हे पुस्तक आहे. पीएसआय आणि सीडीपीओ परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना, मानव संसाधन अभ्यासकांना, औद्योगिक तसेच सेवा क्षेत्रात कार्यरत कर्मचारी व उद्योजकांनाही हे पुस्तक उपयुक्त ठरेल.
कमी खर्चात कांद्याच्या विक्रमी उत्पादनासाठी उपयुक्त मार्गदर्शक
दिवंगत लेखक अशोक कांबळे यांचा ‘ठिकरीची फोडणी’ हा पहिलाच कथासंग्रह. या कथांमधून लेखक वाचकाला वास्तवाचे भान करून देतात.
साहित्याच्या आणि व्यंगचित्रांच्या जगात आपले वेगळेपण सिद्ध केलेल्या दोन प्रतिभावंतांचा एक अनोखा प्रकल्प वाचकांच्या भेटीला येणार आहे. प्रसिद्ध कार्टूनिस्ट आलोक निरंतर आणि 'गोष्ट पैशापाण्याची' या बेस्टसेलर पुस्तकाचे लेखक प्रफुल्ल वानखेडे यांनी एकत्रितपणे साकारलेली ही कलाकृती एक नवा अनुभव देणार आहे.
आपली बुद्धी असो की पैसा योग्य ठिकाणी वापरले तरच त्याला किंमत.
"सिनेमा, करिअरमध्ये अडचणी येतात, त्यावेळी अक्षय आम्ही तुझी धडपड आठवतो मग आम्हाला मार्ग सापडतो. अक्षय, तुझी ही जिद्द, धडपड अनेकांसाठी प्रेरणा ठरो!"- प्रवीण तरडे, दिग्दर्शक, पटकथालेखक आणि अभिनेता
A tri-monthly magazine is (in Marathi), based on the nature and importance of questions on the current events for students studying for exams for MPSC, UPSC, Banking, Railway, Forest services, LIC and being published regularly.
आपली बुद्धी असो की पैसा योग्य ठिकाणी वापरले तरच त्याला किंमत.
सकाळ साप्ताहिक हे सकाळ माध्यम समूहाचे कौटुंबीक प्रकाशन असून,राजकारण,समाजकारण,आंतरराष्ट्रीय विषय,भाषा शिक्षण,साहित्य गुंतवणूक व कला या विषयांना स्पर्श करणारे हे साप्ताहिक आहे.गेल्या 29 वर्षापासून प्रकाशनात सातत्य असणारे एकमेव कौटुंबिक साप्ताहिक.वाचकांना दर्जेदार व अधिक वाचनिय अंक देण्याचा प्रयत्न करत असते.वाचकांच्या विविध विषयांच्या अपेक्षा लक्षात घेऊनच...
तुमचा आनंद, तुमचं दुःख, तुमचं प्रेम, तुमच्या वेदना या सर्व तुमच्याच हाती आहेत. यातून बाहेर पडण्याचा एक मार्ग आहे. आणि तो मार्ग तुमच्या आतूनच आहे. - सद्गुरू
सुमारे सहा दशके सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रताप पवार यांना जीवनात आलेल्या अनुभवांवर आधारित लेखमाला ‘सकाळ’च्या रविवारच्या सप्तरंग पुरवणीत प्रसिद्ध होत आहे.
श्री एम यांची ही पहिलीच कादंबरी ‘शून्य’ ह्या संकल्पनेवरील चिंतन असून ती मर्यादा आणि अथांगता तसेच वास्तव आणि पाखंडी गोष्टींमधील भिंत मोडून टाकत, समाजातील प्रचलित कुप्रथांवर भाष्य करते.
डॉ. एस. पी. गायकवाड या तज्ज्ञ लेखकाने लिहिलेल्या या पुस्तकात मुक्त संचार गोठा पद्धती वापरण्यासाठी गुंतवणूक व खर्च, जनावरांसाठी आराम, आजार नियंत्रण, पाणी व्यवस्थापन व सेंद्रीय दूध उत्पादन या कळीच्या मुद्यांबरोबरच इतरही पूरक बाबींचा खुलासा नेटकेपणाने केलेला आहे.
आयुष्यातील ध्येयं, स्वप्नं साकार करण्यासाठी नियोजन करावं लागतं, तर आनंदी आयुष्य जगण्यासाठी आर्थिक-स्वातंत्र्य आवश्यक असतं. पण त्याकरता आधी 'अर्थ-साक्षर व्हायला हवे! अर्थ नियोजनाने सुरुवात करून आपली आर्थिक उद्दिष्टं कशी गाठावी... याचा कानमंत्र देणारं पुस्तक!
कोणता पदार्थ कोणी खावा, कोणी खाऊ नये, त्यामधील पदार्थांचे गुणविशेष, त्या पाककृतीचे हेल्थमीटर आदी आहारशास्त्रीय माहिती आकर्षक मांडणीसह.
‘बा, तथागता!’ हे महाकाव्य छंदोबद्ध नाही. ते मुक्तछंदातील आहे. सहज आकलन व्हावे यासाठी ते तीन आविष्करणांमधून वाचकांसमोर ठेवले आहे. या तीनही आविष्करणांमध्ये संवादशैली वापरलेली आहे.
झटपट आणि सकस टिफिनची रेसिपीधावपळीच्या जीवनात आपण स्वत:च्या शरीराला आहारात शॉर्टकट मारायची सवय लावून घेतो. आपल्या या सवयीमुळे हळूहळू घरातल्या मंडळींचीही सवय बदलते. लहान मुलं असो किंवा मोठी मंडळी असो, आहार समतोल असेल तर आरोग्यही सुदृढ राहतं. असा हेल्दी टिफिन रोज करून देता यावा यासाठी गृहिणींना उपयुक्त अशा टिप्स या पुस्तकात दिल्या आहेत.
जुनी वास्तू पाडून नवं बांधकाम करायचं असो अथवा नवी जागा घेऊन तिथं नव्यानं इमारत उभारायची असो , आपल्यासाठी ती नवनिर्मिती जिव्हाळ्याची ठरते. तिच्यासाठी प्रकाश मेढेकर यांच्यासारख्या कल्पक, पर्यावरणप्रेमी व अनुभवी बाधकामतज्ज्ञाचा सल्ला योग्य दिशा देऊ शकतो. हा अनमोल सल्ला ' दिशा बांधकाम नवनिर्मितीची' या पुस्तकातून आपल्याला हवा तेव्हा, हवा तितका वेळ मिळवता...
महाराष्ट्राचा इतिहास नव्याने घडवणाऱ्या एका करारी, बुद्धिमान, प्रेमळ, द्रष्ट्या स्त्रीच्या चरित्राची अभिनव मांडणी.
मुरडण या शब्दाचा प्रमाण भाषेतील अर्थ वळण असा होतो. कवी आणि कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या बालाजी मदन इंगळे यांचा हा पहिलाच ललित लेख संग्रह आहे. मराठवाडा आणि कर्नाटक सीमेलगत असलेल्या उमरगा आणि आजूबाजूच्या परिसरात जी बोलीभाषा बोलली जाते, त्या बोलीभाषेचा, लयीचा वापर त्यांनी या संग्रहातील लेखांमध्ये केला आहे.
A tri-monthly magazine is (in Marathi), based on the nature and importance of questions on the current events for students studying for exams for MPSC, UPSC, Banking, Railway, Forest services, LIC and being published regularly.
सद्गुरू यांच्या कोईम्बतूर येथील ईशा योग केंद्राच्या पाकगृहात त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होणाऱ्या १०० हून अधिक आगळ्या वेगळ्या आरोग्यदायी आणि तरीही अत्यंत चवदार पाककृती
डॉ. भरत बलवल्ली यांच्या स्वरांची आणि आयुष्याची ओळख करून घेण्यापासून ते स्वरांची शरणागती पत्करून संगीत आणि अध्यात्म यांच्या मधला दुवा प्रस्थापित करून जगातल्या गानरसिकांना एका अलौकिक आनंदाची अनुभूती करून देणाऱ्या एका स्वराधीशाचे साररूपातले हे आत्मकथन आहे.
आरोग्यदायी आहाराचं गाईड गतिमान जीवनशैलीत आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे, आपण अनेक आजारांना आमंत्रण देतो. यासाठी योग्य आहार घेणं, तो ठरावीक वेळेला, ठरावीक प्रमाणात घेणं गरजेचं आहे. आम्लपित्त, बद्धकोष्ठता, मधुमेह, उच्च रक्तदाब अशा विविध चौदा आजारांवर मात करण्यासाठी आहारशैलीचं योग्य मार्गदर्श न करणारं हे पुस्तक
Poultry Business Management Commercial Layer Farming - Modern Management Breeder Management Broiler Farming (Poultry) Information
विज्ञानवादी विचारांचं संकलन
"Best of फॅमिली डॉक्टर ' या संग्रहात प्रातिनिधिक रोग घेऊन त्यांची माहिती, त्यावरचे इलाज समाविष्ट केलेले आहेत. त्यामुळे हे पुस्तक घरात कायम फॅमिली डॉक्टर सारखा सल्ला देणारे ठरू शकेल.
'भारत : संकल्पना, विचार आणि मागोवा' हे पुस्तक संदर्भ पुस्तक आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून भारतीय नागरिकांना त्यांच्या जीवनामध्ये महत्त्वाची ठरणारी सॉफ्ट स्किल्स देण्याचा प्रयत्न केला आहे.
सकाळ दैनिकापासून, 1932पासून, सुरू झालेला "सकाळ' माध्यम समूह महाराष्ट्रातील घराघरांत, सर्वदूर पोहोचलेला माध्यम समूह आहे. मराठी आणि इंग्लिश वर्तमानपत्रे, साप्ताहिके, मासिके, दूरदर्शन वाहिनी, इंटरनेट पब्लिशिंग तसेच पुस्तक प्रकाशन विभाग अशा विविध शाखांमधून "सकाळ' माध्यम समूहाचा विस्तार झाला आहे. सकाळ माध्यम समूहाने नेहमीच आपल्या वाचकांना स्थानिक ते जागतिक घडामोडी, माहिती आणि मनोरंजन, शिक्षण आणि सामाजिक अशा सर्वच क्षेत्रांतील अद्ययावत ज्ञान देण्याचे धोरण ठेवले आहे. "सकाळ पुस्तक प्रकाशना'च्या सूचीवर नजर टाकली तरी हेच धोरण दिसून येते. सर्वसामान्यांच्या जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करणारी माहितीपर, प्रेरणादायी आणि रंजनपर पुस्तके असे "सकाळ प्रकाशना'च्या पुस्तकांचे स्वरूप आहे. यामध्ये आपल्याला आहार, आरोग्य, आर्थिक साक्षरता, व्यतिमत्त्व विकास, पालकत्व, शेतीविषयक अशा विविध विषयांसोबतच प्रेरणादायी व्यतिचरित्रेही दिसतात. प्रवासवर्णन, व्यावसायिक संदर्भ, पर्यावरण अशा विषयांसोबतच मुलांसाठी वाचनीय पुस्तकांचाही समावेश या पुस्तक सूचीमध्ये असलेला आढळेल. त्या त्या विषयातील तज्ज्ञ, अनुभवी लेखक हे या पुस्तकांचे वैशिष्ट्य सांगता येईल. आवश्यक संपादकीय संस्कार, अंतर्गत सजावट व मांडणी, उत्कृष्ट कागद, छपाई आणि एकूणच उत्कृष्ट निर्मिती यांमुळे ही पुस्तके अधिकच देखणी होतात. अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचता यावे यासाठी या पुस्तकांचे मूल्य नेहमीच वाजवी ठेवण्यात येते. "सकाळ'च्या सर्व कार्यालयांमार्फत तसेच महाराष्ट्रातील प्रमुख विक"ेत्यांमार्फत ही पुस्तके सर्वत्र उपलब्ध करून देण्यात सकाळ प्रकाशन यशस्वी ठरले आहे. पुस्तकांचे विषय, लेखक, निर्मिती अशा सर्वच घटकांतील उत्कृष्टतेच्या आग"हामुळे ही पुस्तके वाचकांच्या पसंतीस उतरली आहेत. हीच परंपरा आगामी पुस्तकांमार्फत पुढे नेण्यास सकाळ पुस्तक प्रकाशन विभाग बांधील आहे.